First love and experience in Marathi Love Stories by Monika Suryavanshi books and stories PDF | पहिल प्रेम आणि अनुभव

Featured Books
Categories
Share

पहिल प्रेम आणि अनुभव

प्रेम आणि अनुभव

मी या आधी प्रेम नव्हत केल आणि अनुभव ही नव्हता ना कधी करु वाटल.

 

अचानक मी मुबंई वर गावी आली.काही अडचणीमुळे याव‌ लागल.वाईट वाटत होत गावी राहायच मग माझ्या आयुष्याच कस.आणि प्रत्येक आयुष्याचा टरनीग पाईंट असतो तसा माझ्या आयुष्याला भेटला.माणस नवीन,काही माहित नव्हत.आणि गावी आले,पहिले दिवस खुप बोर जायचे नंतर सवय झाली.

 

असच एक दिवशी फिरत असताना एक मुलगा दिसला.निळा रंगचा शर्ट , बग घेउन जात होता,दिसायला सावळा पण त्याची केस सळसळीत जणु त्याला ते शोभा देत होते.मी त्याला बघितल आणि बघतच राहिले.पण तो मात्र रक्ष न देता निघुन गेला.दुसऱ्या दिवशी मी वाट पाहत होती त्याची त्याच रस्त्याला पण तो काही दिसला नाही म्हणुन निराक्ष होउन घरी गेले.

 

नंतर काही दिवसानी त्याची मला रीकवेस्ट आली फेसबुक ला मी खुप खुश झाली आणि प्रश्न ही मनात आले.याने मला बघितल नाही मग याने मला शोधल कस? जास्त काही‌ विचार न करता मी त्याला मेसेज केला. आणि त्याने सुध्दा मला मेसेज केला.मग बोलण चालू झाल तेव्हा मला समजल मुल बघत नसली तरी त्याच लक्ष सगळी कडे असत फक्त दाखवत नाही.

 

रोज त्याचा मेसेज यायचा मीही करायची आमच्या ईगो अस काही नव्हत.बिनदास्त बोलायच जस कि आधी पासुन ओळखतो.आणि मी वाचल होत ,जर नवीन माणस भेटली आणि आपल्याला अस वाटल की हे लांबचे नाहीत,पटकण मण जुळली तर आपला संबध पाटिमागच्या जन्माचा असतो.आधी मी यावर विश्वास नव्हती ठेवत पण आता ते खर वाटू लागल.

 

बोलण वाढल दिवस त्याच्या पासुन सुरू व्हायचा आणि रात्र त्याच्यापर्यत संपायची. त्यावेळी मला समजल कि ,तो मला पहिल्यादा दिसला होता तेव्हा तो पुण्याला चाला होता जोब साठी आणि तो आता घरी येणार होता.मी खुप आनंदी झाली खुप दिवसानी तो मला दिसणार.आनंद माझा गगनात मावत नव्हता.आणि तो आला गावी त्यावेळी मला समजल योगायोग कशाला म्हणतात... कारण तो माझ्या घरा समोरच राहत होता आणि माझ्या घरातल्या सगळ्याना ओळखतही होता .मग माझ्या मनात गाण वाजू लागल.हद्यात वाजे समथिंग ... पण हे मला वाटण त्याला वाटत असेल का माझ्याबधल कि त्याच कोणी असेल.

 

जास्त विचार करता मी बोलुण टाकल ,मला तु आवढतो .मी बोली खर पण तो काय बोलेल यावर मनाला काहुर लागली.त्याने मेसेज बघितला पण काही बोला नाही मी सकाळी मेसेज केला तरी तो बघूण बोला नाही बोलणच त्याने बंद केल अस वाटल.नंतर त्याने दुपारी फोन केला मला वाटल आता काही खर नाही काहीतरी बोलेल.मी हळु आवाजात ..हेलो बोली तर तो मला बोला काय मेसेज केला तु मला ही तु आवढते पण.. या पण मुळे माझ्या डोळ्यात पाणी आल कारण पण मी कोणावर तरी प्रेम करतो अस असल तर उत्तर.मी तरी विचारल पण काय तर बोला पण मी तुझ्यावर प्रेम करतो हे एकताच मला खूप भारी वाटल मीही बोले मी पण करते प्रेम. तो बोला भेटुन बोलु या मी त्यावेळी हा बोली सांगेण कुठे भेटारच आणि फोन ठेवला.

 

पण नंतर मनात पश्न आले खरच मुलगा चांगला असेल ना.एखाद्यावर विश्वास ठेवण कधीकधी चुकीच ठरत समजत नव्हत काय करायच.कोणाला बोलायच कारण आपण मैत्रीणीणा बोलो तर ते नको,मुल चांगली नसतात,मी केलय प्रेम माहिते मला असच बोलतात त्यामुळे हा निर्णय आपण घेण चांगल अस वाटल.त्याला मी बोली थोड्या दिवसानी भेटु तो ही बोला ठिक आहे आणि तो पुण्याला गेला.

 

जिव लावुन कधी पारखयाच नसत,पारखुण जीव लावयचा म्हणजे त्रास होत नाही म्हणुन मी त्याच्यासबोत बोलत राहीले पारखु लागले आणि नंतर भेटायच ठरवल.