education system in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | शिक्षणायण

Featured Books
Categories
Share

शिक्षणायण

शिक्षणायण
अंकुश शिंगाडे

तो हिवाळा सुरु होता. थंडी वाजत होती. तसा कचरु आज अंथरुणावर खिळून बसला होता.
सकाळ झाली होती. परंतु तो काही बाहेर पडत नव्हता अंथरुणाच्या. झोप पहाटेलाच उघडली होती. परंतु थंडीमुळं अंथरुणाच्या बाहेर पडावसं वाटत नव्हतं.
कचरु एक शेतकरी होता. दररोज तो शेतीवर जाण्यासाठी सकाळीच उठायचा. तशी अंघोळ न करताच तो शेताकडे निघायचा. शेत त्याचं जवळच होतं. तसा तो शेतात पोहोचताच प्रातःविधी आटोपवायचा. त्यानंतर तो घरी यायचा. घरी आल्यावर जेवनखावण करायचा व पुन्हा तो आपल्या दिवटीवर म्हणजे शेतात निघून जायचा. त्यानंतर तो सायंकाळ झाली व थोडा अंधार पडू लागला की शेतातून बाहेर पडायचा. असा त्याचा नित्य क्रम होता.
कचरुचं नाव कचरुठेवलं होतं त्याच्या मायबापानं. त्याचंही एक कारण होतं. ते म्हणजे त्याच्या मायबापाला बरीच मुलं झाली होती. परंतु साथीच्या येणाऱ्या रोगात ती वाचली नव्हती. काही मुलं वेगवेगळ्या आजारांनी मरण पावली होती. त्यातच आता अंतिम समयी देव देव करीत कचरुचा जन्म झाला व नाव ठेवायचा योग आला. तसं त्याच्या आईला तिची मरणारी मुलं आठवली व ती आपल्या पतीला म्हणाली,
"आपण आपल्या पुर्वी मेलेल्या बाळांचं नाव चांगलं चांगलं ठिवलं होतं. परंतु ते वाचले नाईत."
"हो, तेवकचऱ्यासारखे जन्माला आले. अन् कचरा जसा फेकून देतेत. तसे मरण बी पावले."
"हो, हे बी कचऱ्यासारखंच जनमाले आलं असन काहो?"
"आतं मी तरी का सांगू बा. ते समदं देवाच्या हातात हायती."
"हो नं."
"पण धनी नाव तं ठिवाच लागन नं."
"हो, ते बी बराबर हाये."
"का नाव ठेवून तं जी?"
"नाव.......नाव."
तो विचार करु लागला. तसं त्याला आठवलं व तो म्हणाला,
"कचरा. कचरु ठेवूया नाव आपण."
"कचरा! हे काय नाव झालंया?"
"हो. नावच की."
"पण धनी लोकं का म्हणतीन जी?"
"लोकाईचं का कराचं हाये. आपल्याले आवडलं नं. मग बाकीचे काई बी म्हणोत. आपल्याले त्याची लाज कायची? अन् तुनं बी पायलं का आजपर्यंतची आपली मुलं, कोणती मार जगली. तुले माईत हाये नाय का, किती चांगली चांगली नावं ठेवली होती आपण. पण जगली का? आतं कचरा नाव ठेवून पावू. पावूया जगते का ते?"
"ते बी बराबर हाये. कचरा तं कचराच. नंतर बदलवता येईन."
"हो, ते बी खरं हाय."
त्या पतीपत्नीचं ते बोलणं. तसे ते बोलत असतांना कचरु नाव ठेवायचं ठर. तसं कचरु नाव ठेवण्यात आलं व त्याचं चांगलं संगोपन करण्यात आलं.
आज कचरु लहानाचा मोठा झाला होता. शिक्षणाच्या संधी शोधत होता.
कचरुचा जन्म कचऱ्यासारखाच झाला होता. परंतु त्याचा जन्म जरी कचऱ्यासारखा झाला असला तरी त्याच्या बानं त्याची फार काळजी घेतली होती.
कचरु लहानाचा मोठा होवू लागला होता. तसं त्याचं आता शाळेचं वय झालं होतं आणि आता तो शाळेत जावू लागला होता.
ती शाळा.......ती शाळा जि. परीषदची सरकारी शाळा होती. तसं पाहता त्याही काळात जि. परीषदच्या शाळेत शिकवणं म्हणजे मुलांचं आयुष्य वाया घालवणं असा लोकांचा समज होता. तसं पाहता त्या काळात जि. परीषद शाळेत शिकवत होतेच. परंतु लोकांचा समज झाला होता की जि. परीषद शाळेत अजिबात शिकवीत नाहीत. त्यांचा कल कॉन्व्हेंट शाळेकडे जास्त होता.
जि. परीषद शाळा चालत नव्हत्या. कारण त्यांनी स्वतःला अपडेट केलं नव्हतं. अपडेट करण्याकडे त्यांचा कल नव्हता व ते स्वतःला अपडेट करु पाहात नव्हते. मात्र कॉन्व्हेंट शाळेनं स्वतःला अपडेट केलं होतं. तशीच कॉन्व्हेंट शाळा मुलांचा अपडेट स्तरावर विकास करीत होत्या. म्हणूनच कॉन्व्हेंट शाळा चालत होत्या. कचरुनं शाळेत नाव टाकलं. तसा काही काळ कचरुला ती शाळा अपडेट नसल्यानं आवडत नव्हती. कारण शाळेत शिकविलं जाणारं तंत्रज्ञान हे कंटाळवाणं वाटत होतं. एरवी त्या शिकविण्यात कंटाळवाणेपणाच होता.
जि. परीषद शाळेतही शिक्षण होतं कॉन्व्हेंटसारखंच. परंतु त्या शाळेतील शिक्षक जुन्याच शिकविण्याच्या पद्धतीनं शिकवीत होते. शिक्षकांना आनंददायी पद्धतीनं कसं शिकवावं हे माहीत नव्हतं. त्यामुळंच त्यांनी जुन्याच पारंपारीक पद्धतीनं शिकवणं सुरु ठेवलं होतं. म्हणूनच आज जिल्हा परीषद शाळेत मुलं टिकत नव्हती व जास्त मुलं नव्हती.
कचरुला न आवडणारं शिक्षण. अशातच नवीन अभ्यासक्रम आला व सर्वप्रथम शाळा स्तरावर बदलाव झाला. कचरुच्या शाळेतील एक शिक्षक वेगळंच काही करीत होता. जणू तो अपडेट झाला असल्याचं वाटत होतं. तो आता शिकवीत नव्हता. फक्त मार्गदर्शन करीत होता.
अलिकडे काळ बदलला आहे. बदलत आहे. अशा काळात नवनवीन गोष्टी देशात येवू घातलेल्या आहेत. येत आहेत. नवीन तंत्रज्ञानही येत आहे. अशा बदलत्या काळानुसार आपल्यालाही बदलणं गरजेचं आहे. त्यालाच अपडेट होणं म्हणता येईल. ज्याला असं अपडेट होणं जमत नसेल, त्यानं मेलेलं बरं. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
शिक्षकाची नोकरी. अलिकडे सर्वांना शिक्षकाच्या नोकरीचा वीट आलेला दिसतोय. ती कराविशी वाटत नाही. त्याचं कारण आहे त्याला असणारी अशैक्षणिक कामं. त्यातच प्रशिक्षणाचीही रेलचेल असते.
आजवर आपण पाहिलं की शिक्षकासाठीच नाही तर जगातील सर्वच बाबींसाठी सरकारनं लोकांना प्रशिक्षीत केलं. त्याला इंग्रजीत मिटींग अर्थात आणि मराठीत सभा असं नाव दिलं. कोणतेही प्रशिक्षण यातूनच साकार झालं. शिवाय या माध्यमातून प्रशिक्षण साकार होत असतांना त्यात चहापाण्याची भर घातली गेली व हा चहापानाचा खर्च अधिकारी वर्गानं आपल्या खिशातून काढला नाही तर तो शासनाच्या तिजोरीत टाकला व शासनानंही तो खर्च स्वतः केला नाही तर तो जनतेच्या खिशात टाकला असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण जनताच सरकारचा खर्च उचलते आपल्या खिशातून कोण्या ना कोण्या बाबींतून कर भरुन. मात्र यात सरकारच्या या सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी होते हे न सांगायला नको. तसं पाहिल्यास आजपर्यंत आलेली प्रशिक्षणं तेवढ्या मोठ्या प्रमाणावर महत्वाची नव्हतीच.
निपुण भारत योजना. ही सरकारची योजना आहे व ती साकार करणं हाच सरकारचा उद्देश आहे. कारण त्यातून एक व्यक्ती नाही तर गावं न् गाव निपुण बनणार आहे. एक गावंच नाही तर शहर, राज्य व देशही निपुण बनणार आहे. मग जग बनो की न बनो. ते बनवीत असतांना सरकारसमोर जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीचं उदाहरण आहे की ज्या जपानच्या या दोन्ही संपन्न शहरावर दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्ब टाकल्या गेला. तेव्हा संपुर्ण जपान बेचिराख झाला. तसेच तिथं भुकंपाचे कधीमधी धक्केही लागतात. त्यातही जपान बेचिराख होतं. असं असतांना आजही हा जपान देश अलीकडील काळात संपन्न देश म्हणून ओळखला जातो. त्याचा अभ्यास केला सरकारनं व ठरवलं की आपल्या या देशाला सक्षम बनवायचं. त्यासाठी तंत्रज्ञान विकसित करायचं. मग ते जर करायचं असेल तर काय करायला हवं? असा विचार करुन सरकारनं निपुण भारत योजना आणली.
निपुण भारत योजना. ती आणताच ती कार्यान्वीत कशी करता येईल याचा विचार झाला. त्यासाठी ती राबवणे गरजेचे. परंतु राबविण्याच्या त्या गोष्टी मोठ्या व्यक्तीला सांगीतल्यास तो व्यक्ती ऐकेल काय की चालढकल करेल? हाही एक प्रश्न पडला. त्यानंतर सरकारनं विचार केला की याला लायक कोण? तसा विचार करताच त्यांच्या डोळ्यासमोर आला शिक्षक व शिक्षणक्षेत्र. कारण शिक्षक हा इमानदार व अतिशय मेहनत घेणारा. मग आठवलं की हे तंत्रज्ञान बालपणापासूनच शिकवायला हवं. तरंच देश निपुण होईल. मग काय, तेथूनच सुरुवात करायची सरकारनं ठरवलं व सरकारनं निपुण भारतचं हत्यार शिक्षणक्षेत्रापुढं टाकलं व सांगीतलं की याचा वापर करायचा आहे. मग तो कसा करायचा ते पाहा. प्रशिक्षणं द्या. नाहीतर अजुन काही करा. फक्त देश निपुण बनायला हवा. नाहीतर तुमची काही खैर नाही. शेवटी त्यानंतर शिक्षणक्षेत्रानं निर्णय घेतला की आता काही बरं नाही. आता आपण शिक्षकांच्या माथी निपुण भारतची योजना टाकायला हवी. तेच खऱ्या अर्थानं इंद्रधनुष्य पेलवणारे असतात.
शिक्षणक्षेत्र.......त्यांनी तसं ठरवताच अभ्यासक्रम तयार केल्या गेला. त्या अभ्यासक्रमात नवनवीन गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या. त्यानंतर तो अभ्यासक्रम राबविण्यासाठी शिक्षकाला प्रशिक्षण देण्यासाठी बोलावलं गेलं व नेहमीच्या प्रशिक्षणासारखं हेही एक प्रशिक्षण समजून शिक्षक नावाचा प्राणी उपस्थीत झाला तोही नेहमीप्रमाणेच. चालढकल करुन प्रशिक्षण पुर्ण करावं असा त्यांचा विचार होताच. परंतु नाही.
ही प्रशिक्षणं इतर प्रशिक्षणासारखी नव्हती. कारण यात सुरुवातीलाच शिक्षकांनी ऐकलं की आता शिकवायचं अजिबात नाही. त्यामुळंच शिक्षकांना ते प्रशिक्षण आवडलं. कारण कोणतीही गोष्ट करु नका म्हटलं तर त्या गोष्टीत कोणीही जास्त लक्ष जसं घालतो. तेच या निपुण भारत प्रशिक्षण देतांना घडलं.
निपुण भारत प्रशिक्षण चांगल्यासाठी आहे. ते प्रत्येकानं घ्यावं. शिक्षकानंच नाही तर पालकांनीही घ्यावं. तसं पाहिल्यास ती आजची गरज आहे. शिवाय याबाबतीत काही व्हिडीओ यु ट्युबवर अपलोड आहेत. फक्त आपल्याला यु ट्युबवर निपुण भारत असं टाईप करुन विषय टाकायचे आहेत. आपोआपच साईट खुलेल. थोडा नेट कव्हरेज असावा. त्यात आपल्याला निपुण भारत योजनेत काय काय करता येईल. त्याची इत्यंभूत माहिती आहे.
महत्वाचं सांगायचं झाल्यास निपुण भारत ही सरकारची योजना अतिशय सुंदर असून देश कसा विकसीत करायचा याची ही योजना आहे. त्याची प्रशिक्षणही चांगली आहेत. शिक्षकांसाठी तर ही योजना अतिशय सुंदर योजना आहे. त्यातच भविष्यवेधी शिक्षण अभ्यासक्रमही शिक्षकांसाठी चांगला आहे. मात्र ते भविष्यवेधी शिक्षण कसं विद्यार्थ्यांना देता येईल? त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक. ते युट्यूबच्या माध्यमातून मिळू शकतं. तसं पाहता सर्वांना अपडेट होण्याची गरज आहे. जसं व्हाट्सअप, फेसबुक वा इतर ॲप आपण अपडेट करतो तसे. बदलाव गरजेचा. ज्यात बदलाव होत नसेल. तो नष्ट होतो. त्याची गरज संपते. निपुण भारत वा भविष्यवेधी शिक्षण हेच सांगतं की स्वतःला अपडेट करा. मगच तुम्ही जगाच्या स्पर्धेत टिकाल. नाहीतर तुमचा या जगात असण्याचा काहीही अधिकार नाही. त्यापेक्षा तुम्ही मेलेले बरे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
कचरुच्या शाळेत शिकविणारा तो शिक्षक काहीच शिकवीत नव्हता. तो फक्त मुलांना आव्हान द्यायचा. म्हणायचा की हे तुम्हाला करताच येत नाही. मग जिद्द चढायची. वाटायचं की आपल्याला काहीच करता येत नाही असं शिक्षक का म्हणतात. मग हुरुप चढायचा कचरुला व कचरु नव्या उमेदीनं त्या गोष्टी करायचा. त्यातच इतर मुलंही.
कधीकधी त्या शिक्षकाला काय वाटायचं माहीत नाही. तो शिक्षक चांगलं काम केल्यावर सेल्फीही घ्यायचा व ती सेल्फी स्वरुपात काढलेली फोटो व्हाट्सअप ग्रुपवर पाठवायचा. तो कचरुच्या वडीलांना जायचा व त्या अल्प प्रमाणात शिकलेल्या वडीलांना अतिशय आनंद व्हायचा व बिचारा कचरुचा बाप आपल्या मुलांबद्दल त्याला चांगलं वाटताच तो त्या सेल्फी फोटोचा फोटो आपल्या डीपीवर ठेवायचा. अशाप्रकारे कचरुचा विकास होत चालला होता. नवीन अभ्यासक्रमानुसार कचरु त्या नवीन शिक्षकाच्या शिकविण्यानं भारावून गेला होता. त्याच्यात जिज्ञासावृत्ती वाढीस लागली होती. त्यामुळंच कचरु त्या शिक्षकांच्या कोणत्याही आव्हानाला स्विकार करीत असे व त्याच आव्हानाच्या भरवशावर कचरु आता जिल्हा परीषद शाळेत घडत चालला होता.
आज स्पर्धेचा काळ होता. या स्पर्धेच्या काळात टिकायचे असेल तर आव्हानानुसार शिकावे लागत होते. त्यातच तसं आव्हान स्विकारुन स्वतःला सिद्ध करावे लागत होते.
सरकारी शाळा आतापर्यंत ओस पडल्या होत्या. त्या शाळा आता चालायला लागल्या होत्या.