Navnath mahatmay - 5 in Marathi Mythological Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | नवनाथ महात्म्य भाग ५

Featured Books
Categories
Share

नवनाथ महात्म्य भाग ५

नवनाथ माहात्म्य भाग ५



गोरखनाथांच्या शिकवणीनुसार योग आणि शैव या दोन्ही गोष्टी एकसंध आहेत.
गोरखनाथांचा असा विश्वास होता की जेव्हा एखादी व्यक्ती सिध्दीची मर्यादा ओलांडते तेव्हा ती शून्य अवस्थेत पोहोचते, मग त्याचे वास्तविक जीवन सुरू होते.
शून्य म्हणजे स्वत: ला प्रबुद्ध करणे, जिथे एखाद्याला अंतिम सामर्थ्याचा अनुभव घेण्यास सुरुवात होते.
हठयोगी निसर्गाच्या सर्व नियमांपासून मुक्त होतो आणि त्याला आव्हान देतो .
ही एक अगदी अदृश्य शक्ती असते ज्यामधुन शुद्ध प्रकाश उत्पन्न होतो.

गोरखनाथजींनी नेपाळ आणि भारत सीमेवर प्रसिद्ध शक्तीपीठ देवीपाटन येथे तपश्चर्या केली.
याच ठिकाणी पाटेश्वरी शक्तीपीठ स्थापन करण्यात आले.
गोरखनाथांचे गोरखपूर येथे भारतातील एकमेव प्रसिद्ध मंदिर आहे.
हे मंदिर यवन आणि मोगलांनी बर्‍याच वेळा पाडले परंतु प्रत्येक वेळी ते पुन्हा तयार केले गेले.
9 व्या शतकात त्याचे नुतनीकरण करण्यात आले परंतु मुस्लिम हल्लेखोरांनी ते 13 व्या शतकात पुन्हा पाडले.
नंतर मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आणि संरक्षणासाठी साधुंचे एक कार्यदल तयार केले गेले.

योगशास्त्रावरील श्री मछिंद्रनाथ स्वामी आणि श्री गोरक्षनाथांची सत्ता असामान्य होती.
समाधीयोग, आत्मबोध, नाद्ब्रम्ह, बिंदूब्रम्ह, शून्यतत्व आणि निरंजन तत्व ह्या सर्वांचे ज्ञान आणि अनुभूती त्यांच्यात परिपूर्णतेने स्थित होती.
त्यांच्या ग्रंथसंपदेत ह्याचा पदोपदी प्रत्यय येतो.
अद्वयतारक उपनिषद, मंडलब्राम्हण उपनिषदांत उल्लेखिलेले अमुर्त तारकयोग, उत्तरतारक योग, अमनस्क योग हा तर नाथांच्या विशेष अभ्यासाचा विषय होता.
चक्रभेदन शून्यभेदनादी अवस्थामधून शिवशक्तीरूप सामरस्य कसे प्रत्यक्षात साधता येते हे ह्या दोन्ही स्वामींनी दाखवून दिले.
ते ज्ञान आपल्या मोजक्या शिष्यांना काहीही संकोच न करता, त्यांच्या योग्यतेनुसार दिले.
ज्ञानमार्गातील निर्गुणावस्थेच्या अत्यंत अवघड मार्गावर त्यांनी योग्य अशा शिष्य वर्गाला मार्गदर्शन केले.
बौद्धांच्या शून्यतत्वाच्या पलीकडे अतिशून्य, महाशून्य, सर्वशून्य ह्या अवस्थांचा भेद करून ब्रम्हरंध्रातील निजवस्तू ,सत्य कसे अनुभवावे ह्यावर त्यांचे प्रभुत्व होते.

ज्ञान, योग अर्थातच ध्यान ह्या योगांचा समन्वय त्यांनी साधला.
तथापी प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे आणि पिंडानुसार त्यांनी साधना आणि आचरणाचे नियम घालून दिले.
नाथांची विचारधारा फार सखोल होती. द्वैत-अद्वैतापर्यंतच ते थांबले नाहीत.
त्याच्याही पलीकडे असलेले हे "द्वैताद्वैत विलक्षण" नाथतत्व त्यांनी तत्ववेत्त्यांपुढे ठेवले.

मानवी देह कुठल्याही आश्रमात असो - ब्रम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, अगर संन्यासाश्रम, ह्या प्रत्येक जीवन प्रणालीला उपयुक्त अशी साधना त्यांनी सांगितली.
त्यांची धर्म संकल्पनाच वेगळी होती.
प्रत्येक आश्रम हा त्यांनी धर्मच मानला होता.
उन्नत करणारे जीवनाचे कार्य, आचार ,विचार, विवेक पद्धती, हाच धर्म त्यांनी मानला.
परंतु ती व्याख्या संकुचित कधीच नव्हती.
त्यात मानवधर्म हाच अभिप्रेत होता.
तो सर्वांसाठी होता आणि विश्वात्मक होता.
प्रेमाच्या, समतेच्या आणि विश्वभावाच्या अभेद्य शिलेवर स्थित असलेला तो परिपुर्ण असा नाथांना अभिप्रेत असलेला मानवधर्म होता आणि आहे.
नाथांनी कालमानाप्रमाणे कार्याची योजना केली.
त्यात एक दृष्टेपणा होता .
काळाच्या स्थित्यंतरात जीवन पद्धतीत अमूलाग्र बदल झाला.
अस्थिरता वाढली.
त्या परिस्थितीत योगाचरण अशक्य नाही, परंतु फारच अवघड झाले म्हणुन नाथांनी पूर्वापार सिद्ध असलेल्या भक्तिमार्गाला चालना दिली.
नाथसंप्रदायातील विष्णूपूजन, ह्या सगुण भक्तीची साक्ष देते.

ज्ञानोत्तर भक्ती सारखेच भक्तीतून निर्माण होणाऱ्या ज्ञानावर त्यांनी भर दिला.
डोळस भक्ती शिकविली.
तसे अपार योग्यतेचे नाथशिष्य निर्माण केले.
त्यांच्यानंतर श्री गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथ घडविले आणि श्री निवृत्तीनाथांनी आदर्श असे श्री ज्ञानेश्वर महाराज घडविले.
परंपरा खुप वाढली आणि वाढत आहे.
उच्चकोटीची ग्रंथसंपदा निर्माण झाली.
भक्तीचा पुर लोटणारा वारकरी सांप्रदाय उदयास आला.
भक्तीचे एक वेगळे पर्वच सुरु झाले.
मानवतेच्या उद्धाराचा प्रत्येक मार्ग कालमानाप्रमाणे नाथांनी विश्वाला प्रदान केला.
हे एक महान कार्य आहे.
ह्या मार्गात कोणाचाच अव्हेर नाही.
त्यांनी नाथतत्व आपल्यापुढे मांडले आहे.
दिव्य नाथांनी हे काम केले आहे.
ते कृतीत उतरविणे ह्यातच आपला उद्धार आहे.
त्यांच्या शिकवणी प्रमाणे कोणीही अनाथ नाही.
चौर्यांशी सिद्ध नवनाथांना हृदयाच्या अंतःकरणातून हा आदेश आला आहे .

गोरक्षनाथांच्या साधनामय जीवनात लौकिक काहीच नव्हते.
जनरीतीमध्ये सहभाग नव्हता आणि म्हणून प्राणविहीन शरीर होते .
एकदा गुरु शिष्य भ्रमण करीत असतांना एका मृत मनुष्याचा अंत्यविधी पाहून गोरक्षनाथांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले.
बारावर्षे तपश्चर्या करतांना दिवसरात्र वर्षमहिने ही कालाची जाणीव हरपल्याने प्रश्न उमटला
'रात्रंदिनाचे हे चक्र कसे सुरु रहाते ?
आणि ज्योतीरुप प्राण असतो तरी कोठे ?
आणि अंतिम सत्य कोणते ?
त्याच स्थान काय ?'

मछिंद्रनाथांचा मानसपुत्र, त्यांनी घडविलेला शिष्य आणि साधनेतूनच उन्नत झालेला नाथोत्तम होते गोरक्षनाथ.
त्यांच्या वैराग्य मनातल्या प्रश्नांना केवळ सदगुरु स्वामी मच्छिन्द्रनाथच समर्पक उत्तरे देऊ शकतील,असे होते ते प्रश्न.
स्वताःच्या शिष्याला आदराने "अवधूत" म्हणजेच वैराग्यांचा अग्रणी म्हणणारे गुरु मछिंद्रनाथ उत्तर देत गेले.
ते म्हणाले हे अवधूता..रात्रीच्या गर्भात दिवसाचा वास असतो आणि दिवसाच्या पोटी रात्र ही असतेच!
या जगाच्या काल गणनेला सुरवात झाल्यापासुन दिवस-रात्रीचे चक्र सुरूच आहे, त्यात खंड नाही.
दिप प्रज्वलीत झाला की आपण म्हणतो प्रकाश पडला.
पण धातूचा अथवा मातीचा दीप असेल तर त्याचा उजेड नाही पडत.
त्यात वात असेल तरच ज्योत तेवते.
त्या वातीमुळे ठराविक भागापर्यंत मंद प्रकाश पोहोचतो पण त्यापुढे काय?
तर प्रत्येक दिपामध्ये ज्योत असते, कधी उजळलेल्या तर कधी न उजळलेल्या वातीच्या रुपात.
प्रकाश देण्याची शक्ती त्या ज्योतीमध्ये असते.
धातुच्या, मातीच्या, दिव्यामध्ये नाही.
त्याचप्रमाणे देहामध्ये सुद्धा प्राण असतो.
प्रत्येकाचा पिंड (जीव) वेगळा.
प्रत्येकात वास करणारा प्राण मात्र एकाच परमात्म्याचा अंश असतो.
तरी पण गोरखनाथ शंका विचारू लागले ..पण गुरूजी, रात्रच नसती तर दिवस कसा निर्माण झाला असता ?
आणि इतक्या प्रकाशमान दिवसामध्ये रात्र कशी सामावली ?
दिव्याच्या प्रकाशाचे काय ? जर ज्योतच निमावली तर तो प्रकाश कोठे जातो ?
आणि जर हे इतके वेगवेगळे देह निर्माण झाले नसते तर त्यामधले प्राण कोठे असते ?.
अशा प्रश्नोत्तरात त्या दोघांचा संवाद चालत असे .

नेपाळचा परमसिद्ध योगी श्रीगोरक्ष यांचे नाव नेपाळच्या राज्य चलना (नाणी) वर आहे, आणि तेथील रहिवाशांना गोरक्ष असे म्हणतात.
गुरखा नावाची सैन्य जमात फक्त गुरु गोरक्षनाथांच्या रक्षणासाठी होती.
नेपाळच्या शाही राजवंशाचे संस्थापक असलेल्या महाराजा पृथ्वीनारायण शाह यांना गोरक्षनाथ यांच्याकडून शक्ती मिळाली.
त्यामुळे नेपाळच्या राजाने नेपाळच्या राजमुद्रेवर श्रीगोरक्षनाथ यांचे नाव आणि राजमुकुटामध्ये त्यांचे चरणपद चिन्ह ठेवले.

नेपाळच्या गोरखांचे नाव फक्त गुरु गोरखनाथजींच्या नावावरून पडले.
नेपाळमधील गोरखा जिल्ह्यालाही त्याचे नाव गुरु गोरखनाथ असे पडले.
गुरु गोरखनाथ प्रथम जेथे दिसले तेथे एक गुहा आहे.
जिथे गोरखनाथला एक प्राण्याचे उमटलेले चिन्ह दिसले आणि तिथे त्याचा एक पुतळा आहे.
दरवर्षी वैशाख पौर्णिमा ह्या दिवशी उत्सव साजरा केला जातो, त्याला रोट महोत्सव म्हणतात आणि येथे मोठी जत्राही भरते .
गोरखधंधा म्हणजे लोकप्रिय मतानुसार त्यांनी बर्‍याच कठोर (गंजलेल्या) रगांचा शोध लावला.
लोकांना त्यांचे अनोखे रग पाहून आश्चर्य वाटले.
नंतर अनेक नीतिसुत्रे प्रचलित झाली.
गोरखपंथी: ..
गोरखनाथ यांनी प्रोत्साहन दिलेला 'योगिसंप्रदाय' मुख्यत्वे बारा शाखांमध्ये विभागलेला आहे.
म्हणूनच त्याला 'बारावा' म्हणतात. (१) भुजचे कंथरनाथ, (२) पागलनाथ, (३) रावळ, (४ ) विंग्स किंवा पंक, (५ ) वन, (६ ) गोपाळ किंवा राम, (७ ) चंदननाथ कपिलानी, (८ ) हेनाथनाथ, (९ ) मी पंथ, (10) वेराग पंथ, (11) जयपूरचा पवनाथ आणि (12) गजनाथ.

सर्व पंथांमध्ये शैव, शक्ती आणि नाथ या सर्व पंथांचा समावेश होता. एकदा गुरु गोरक्षनाथ तीर्थाटन करत एका गावामध्ये आले.
गावाबाहेर एक मारुतीचे देऊळ होते, तेथे ते थांबले.
एक-दोन दिवस झाल्यावर हळूहळू गावातील मंडळी नाथमहाराजांकडे येऊ लागली.
प्रतिदिन येण्या-जाण्यामुळे गावातील लोकांची त्यांच्याशी बरीच जवळीक निर्माण झाली.
लोक त्यांना अध्यात्मविषयक शंका विचारू लागले.
प्रपंचातील अडचणी सांगू लागले.
तेही त्या सर्वांना योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधान करू लागले.
काही वेळा ते एखाद्या अवघड विषयावर लोकांना मार्गदर्शन करुन अचंबित करीत असत.


क्रमशः