पश्चाताप..

(2)
  • 8.4k
  • 0
  • 3.3k

'पश्चाताप' ही माझी सत्यान्नववी पुस्तक. एका कादंबरीच्या रुपानं ही पुस्तक वाचक वर्गापर्यंत पोहोचवतांना तेवढा आनंद नाही. कारण ही पुस्तक पाहिजे त्या प्रमाणात सरस बनली नसेल, असं मला वाटतं. त्याचं कारण म्हणजे माझा तो एक मित्र. मी त्याला फोन करुन यातील कथानक सांगीतलं. त्यावर तो म्हणाला, "मित्रा, यातील कथानक हे तेवढंच भारदस्त दिसत नाही." त्यानंतर मी त्याला विचारलं, "त्याचं कारण म्हणजे याचं कथानक हे सर्वसामान्य आहे. या कथानकातून कोणताच बोध होत नाही. यातील कथानक सर्वसामान्य आहेत. ज्या कथानकाची माहिती सर्वांनाच आहे. नवीन विचारही नाही व कथानकही नाही."

Full Novel

1

पश्चाताप - भाग 1

पश्चाताप या पुस्तकाविषयी 'पश्चाताप' ही माझी सत्यान्नववी पुस्तक. एका कादंबरीच्या रुपानं ही पुस्तक वाचक वर्गापर्यंत पोहोचवतांना तेवढा आनंद नाही. ही पुस्तक पाहिजे त्या प्रमाणात सरस बनली नसेल, असं मला वाटतं. त्याचं कारण म्हणजे माझा तो एक मित्र. मी त्याला फोन करुन यातील कथानक सांगीतलं. त्यावर तो म्हणाला, "मित्रा, यातील कथानक हे तेवढंच भारदस्त दिसत नाही." त्यानंतर मी त्याला विचारलं, "त्याचं कारण म्हणजे याचं कथानक हे सर्वसामान्य आहे. या कथानकातून कोणताच बोध होत नाही. यातील कथानक सर्वसामान्य आहेत. ज्या कथानकाची माहिती सर्वांनाच आहे. नवीन विचारही नाही व कथानकही नाही." ते त्याचं बोलणं. परंतु ते बोलणं मला जरी वाईट वाटत असलं ...Read More

2

पश्चाताप - भाग 2

पश्चाताप भाग दोन शिक्षक विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून विचार करीत होते. त्यातच सरकारही विद्यार्थी दृष्टीकोनातून विचार करीत होतं. परंतु ते शिक्षण करीत नव्हतं. मात्र ते कधीकधी वक्तव्य करीत होतं की शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवीत नाहीत. ज्यात त्यांना संशयता होती. ती संशयता दूर करण्यासाठी सरकार शिक्षकांची चाचपणी करणार होते. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करणे, पाठ्यपुस्तकातील कोण्या पानाचा प्रभावी वापर करणे, विद्यार्थ्यांची उपस्थिती, आनंददायी शनिवार, एक राज्य एक गणवेश उपक्रम. हे सर्व उपक्रम शाळा राबवते का? यावर शिक्षण विभागाने सुरु केलेली प्रत्यक्ष चाचपणी. याची बातमी त्या शहरातील एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात एक छापून आली होती. त्यात लिहिलं होतं की आता शाळेची परीक्षा होणार. आम्ही ...Read More

3

पश्चाताप - भाग 3 (अंतिम भाग)

पश्चाताप भाग तीन महेश हा रुपालीच्या कार्यालयात कार्यरत असलेला अधिकारीच. तो गरीब असल्यानं गावच्या सरकारी शाळेत शिकला होता. तसं त्याची कॉन्व्हेटला शिकायची ताकद नव्हती. कारण कॉन्व्हेटचं शुल्क अतोनात होतं व ते शुल्क सर्वसामान्य लोकांना परवडणारं नव्हतं. तस ते शुल्क महेशच्या वडीलांना परवडणारं नसल्यानं त्यांनी महेशचं गावच्या शाळेत नाव दाखल केलं होतं व तो तिथंच हिरीरीनं शिकून आज मोठ्या पदावर गेला होता. कॉन्व्हेटनं त्यावेळेस आपलं बस्तान बसवलं होतं व सर्वसामान्य लोकांना वाटत होतं की कॉन्व्हेटला शिकविल्याशिवाय आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळू शकणार नाही. त्याला अधिकारी बनवता येणार नाही. त्यातच याच काळात शिकवणी वर्गाचंही अति प्रमाणात प्रस्थ वाढलं होतं. मान्यता होती ...Read More