अद्भूत रामायण - 2

अद्भुत रामायण भाग २तेव्हा नारदमुनी आणि पर्वत ऋषी दोघांनी तीच्याशी‌ विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा राजा म्हणाला, तुम्ही दोघांनी पण ईच्छा व्यक्त केल्याने आता उद्या दरबारात श्रीमती ज्याला वरमाला घालेल, तो तीचा पती होईल.उद्या येतो असे सांगून ते दोघे तिथून निघाले. नारदमुनी विष्णूंकडे गेले.आणि म्हणाले की, आपला भक्त व महापराक्रमी अम्बरिष राजाची एक श्रीमती नावाची रुपवती कन्या आहे.मला तीच्याशी विवाह करावयाचा आहे. पण आपले भक्त पर्वत ऋषी हे पण तीच्याशी विवाह करुन इच्छितात.‌तेव्हा राजाने सांगितले की, उद्या दरबारात आपणा दोघांपैकी जो अधिक सुंदर दिसेल त्याच्या गळ्यात श्रीमती वरमाला घालेल आणि त्याच्याशी तीचा विवाह होईल. हे विष्णू, तुम्ही माझ्यासाठी एक काम