चोर सोडून संन्यासालाच फाशी

  • 1.5k
  • 1
  • 555

चोर सोडून संन्याशाला फाशी? *आज वाहतूक नियम आहेत व ते असल्यानं कोणताही व्यक्ती सैरावैरा गाडी चालवत नाहीत. ते नियमातच गाडी चालवतात. तसेच वाहतूक नियम पाळत असतांना काही कागदपत्राचीही आवश्यकता असते. त्यातही त्या कागदपत्राअंतर्गत भेदभाव दिसून येतो कधीकधी. कधीकधी हेच पोलीसवाले सामान्य व्यक्ती असतील आणि त्याच्याकडे कागदपत्र नसतील तर जबरन दंड करतात आणि जर तोच व्यक्ती विशेष असेल, श्रीमंत असेल, त्याची ओळखपारख असेल, तर त्याला सोडून देतात. त्यातच आताच्या काळात कधीकधी वाहतूक शाखा ही श्रीमंतांच्या घरची कळसुत्री बाहूलीच झाल्यासारखे वाटते व ती शाखा कधीकधी चोरांना सोडून देवून संन्यासालाच फाशी देत सुटते.* आजकाल पोलिसांनाही मारहाण झाल्याच्या बऱ्याचशा घटना वर्तमानपत्रातून छापून येतात. तसे