अर्धी व निःशुल्क तिकीट?

  • 636
  • 228

अर्धी तिकीट व निःशुल्क प्रवास ; मात्र सामान्य प्रवाशांना मनस्ताप *महाराष्ट्र हा आधीपासूनच सुजलाम सुजलाम आहे. इथे पुर्वी बारमाही नद्या वाहात होत्या आणि आजही बऱ्याचशा भागात बारमाही नद्या वाहात असतात. तसं पाहता या महाराष्ट्राला चांगली अशी ओळख आहे. मग ते क्षेत्र शेतीचं असो की उद्योगाचं. तसंच नद्याही भरपूर असून त्या नद्यांनी आपल्या परीसरातील भुभाग अतिशय समृद्ध केलेला आहे. अशाच या महाराष्ट्रातील काही जिल्हे त्यांच्यामध्ये असलेल्या विविधांगी गुणानं प्रसिद्ध आहेत. जसे संत्र्यासाठी नागपूर, गुळासाठी कोल्हापूर, नाशिक द्राक्षासाठी, जळगाव केळीसाठी, रत्नागीरी हापूस आंब्यासाठी. तशीच या महाराष्ट्रात दळणवळणाचीही साधनं पर्याप्त आणि पुरक आहेत. अशाच या सुजलाम महाराष्ट्रात पुन्हा एकदा फिरण्याचा योग आला तो