भाग्य दिले तू मला - भाग ४९

  • 3.8k
  • 2.5k

अधुरा रेह जायेगा सफर तेरी-मेरी मोहब्बत का कसूर किसका है बता-ए-खुदा क्यू दर्द सहे हम तेरी गलती का?? ती रात्रीची वेळ होती घट्ट काळोख पसरला होता. स्वराला आज ऑफिसमधूनच यायला उशीर झाला होता. ती घरी आली तरीही तीच मन काही कुठल्याच कामात लागत नव्हत. अन्वय हे ऑफिस सोडून कायमचा दिल्लीला जाणार हे ऐकूनच स्वराला अस्वस्थ वाटू लागलं. त्याचा आजचा प्रत्येक शब्द तिला त्रास देऊ लागला. त्याने आजपर्यंत कधीच मन मोकळं केलं नव्हतं पण आज जेव्हा तो बोलला तेव्हा त्याच्या डोळ्यात तिने खूप काही बघितलं होत. ते बघूनच आज स्वराला कस तरी वाटत होतं. अन्वयचे शब्द " कधी भेट होणार की